Followers

Wednesday, April 22, 2020

chhatrapati

राजे धार्मिक होते पण धर्मभोळे नव्हते. साहसी होते पण आततायी नव्हते. त्यांची
राहणी वैभव संपन्न होती पण उधळी नव्हती...
स्वराज्याचे सिंहासन ३२ मणाचे बनवणारा
राजा सूती वस्त्रात, लाकडी पलंगावर झोपत असे.
चित्र, शिल्प आणि संगीत ह्यांना आश्रय देणे यासाठी ना त्यांच्याकड़े वेळ नव्हता. त्यांना मोठ्या मोठ्या ईमारती बांधण्याची फुरसत देखील
नव्हती. दुष्काळात लाखो लोक अन्न-अन्न करीत मरत असताना २० कोट रुपये खर्चुन
ताजमहाल बांधण्यात त्यांना रस नव्हता किंवा त्यांच्या मनाचा तो कल देखील नव्हता...
ते कुशल सेनानी होते, युद्धतज्ञ होते. या खेरीज ते मुलकी कारभाराचे तज्ञ होते.
प्रजेच्या ईहलौकिक कल्याणाची
जबाबदारी आपली आहे, हे त्यांना पुरेपुर माहीत होते. प्रजेवर निरर्थक कर
त्यांनी कधी लादले नाहीत.. मी शत्रूंना दगा दिला, पण मित्रांना दगा दिल्याचे एक तरी उदाहरण दाखवा' असे जाहिर आव्हान त्यांनी दिले होते. त्या आव्हानाला आजतागायत उत्तर आलेले नाही..
कौल देऊन गावे बसवणे, बीघे-चावर जमीन मोजणे, जमीन लागवडीखाली आणणे, बी-
बियाणे - नांगर-बैल यासाठी कर्ज देणे, शेतसारा निश्चित करणे असे विधायक
उपक्रमही त्यांनी केले. त्यांच्या काळात उत्पन्नाच्या ४० टक्के कर होता. आजही हा कर लहान नाही. तरी सुद्धा लोकांनी
२/५ ही वाटणी आनंदाने स्विकारली.
कारण कर दिल्यावर पक्षपात न होता संपूर्ण संरक्षण आणि न्याय याचे आश्वासन मिळायचे..
'पक्षपातरहित निर्दोष अंमलबजावणी' हे
त्यांच्या स्वराज्याच्या राजवटीचे एक गमक होते..!
🚩 जय जिजाऊ 🚩
🚩 जय शिवराय 🚩
🚩 जय शंभुराजे 🚩

No comments:

Post a Comment